Friday 2 March 2012

Mumbai समुद्र मंथन! या योजनेमुळे होणारे फायदे केंद्राची मंजुरी; समुद्राचा गाळ उपसून मुंबई न्हावा-शेवा होणार आणखी खोल


न्हावा-शेवा येथील जेएनपीटी बंदर मुंबईच्या खाडीला जोडणारा सागरी मार्ग आणखी खोल तसेच प्रशस्त करण्याच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे १५७१.६0 कोटी रुपये खर्चाचा हा पहिला टप्पा मार्गी लागणार असून, मोठय़ा जहाजांची वाहतूक सुकर होणार आहे. किंबहुना या कामाला मंजुरी देण्याच्या मसुद्यातच मोठय़ा म्हणजे सहा हजार टनी जहाजांच्या वाहतुकीचा मार्ग प्रशस्त होण्याची बाब नमूद केली आहे.
मुंबईची खाडी आणि न्हावा-शेवा यांना जोडणार्‍या या मार्गिकेची लांबी २९ कि.मी.वरून वाढवून ३३.५४ कि.मी. तर खोली १४ मीटरपर्यंत वाढविण्याचाही त्यात समावेश आहे. हा प्रकल्प साकार झाल्यावर आंतरराष्ट्रीय मालवाहतूक करणार्‍या मोठय़ा जहाजांना मालाच्या चढ-उतारासाठी सध्या करावी लागणारी प्रतीक्षा संपुष्टात येईल, शिवाय रोजगाराच्या आणखी संधीही उपलब्ध होतील. या योजनेमुळे होणारे फायदे मोठी जहाजेही थेट आतपर्यंत येऊ शकतील. आंतरराष्ट्रीय कंटेनर जहाजांच्या वाहतुकीतील अडचणी दूर होतील. जहाजावरून मालाची चढ-उतार वेगाने शक्य होईल. बंदराच्या क्षमतेचा अधिकाधिक उपयोग.
या भागात समुद्राची खोली वाढवून मोठय़ा जहाजांसाठी मार्ग प्रशस्त करण्यात येणार आहे.
     

Mumbai New Traffic Rules मोबाईल महाग! अशा असतील नव्या शिक्षा

 मोबाईलवर बोलणे 
पहिल्या गुन्ह्यासाठी ५00 रुपये दंड. 
पुन्हा तोच गुन्हा केल्यास दंडात उत्तरोत्तर वाढ होऊन कमाल दंड ५,000 रुपये.
सिट बेल्ट न बांधणे 
पहिल्या गुन्ह्यासाठी ५00 रुपये दंड. 
पुन्हा तोच गुन्हा केल्यास दंडात उत्तरोत्तर वाढ होऊन कमाल दंड १,५00 रुपये.
हेल्मेट न घालणे
पहिल्या गुन्ह्यासाठी ५00 रुपये दंड. पुन्हा तोच गुन्हा केल्यास दंडात उत्तरोत्तर वाढ होऊन कमाल दंड १,५00 रुपये.
सिग्नल तोडणे 
पहिल्या गुन्ह्यासाठी ५00 रुपये दंड. पुन्हा तोच गुन्हा केल्यास दंडात उत्तरोत्तर वाढ होऊन कमाल दंड १,५00 रुपये.
वेग र्मयादेचे उल्लंघन 
पहिल्या गुन्ह्यासाठी ५00 रुपये दंड. पुन्हा तोच गुन्हा केल्यास दंडात उत्तरोत्तर वाढ होऊन कमाल दंड ५,000 रुपये. 
..............................
या कायद्यात मोबाईल फोन म्हणजे ध्वनी, मजकूर आणि चित्र यांची देवाणघेवाण करणारे साधन होय, अशी व्याख्या करण्यात आली आहे. 
.......................................
वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे गुन्हा आहेच; शिवाय साधा एसएमएस पाठवला किंवा वाचला तरी दंड होईल. कानाला ब्ल्यूटूथ लावून हॅण्डफ्री मोबाईल वापरून तुम्ही पोलिसांना फसवू शकणार नाही. ही चलाखी केली तरी दंड अटळ आहे. तुम्ही गाडी चालविताना मोबाईलवर गाणे ऐकता? खुशाल ऐका पण मग दंड भरा. चॅटिंग आणि गाडी चालवत फेसबुकवर स्क्रॅप टाकला तरी दंड होईल. 
ड्रंकन ड्रायव्हिंग 
मद्यसेवनाच्या प्रमाणानुसार दंड व शिक्षा. कमाल दंड ५,000 रुपये. कमाल शिक्षा दोन वर्षे. दंड व कारावास दोन्ही शिक्षा होऊ शकतात. मुंबईचे आकडे काय सांगतात? राज्यांना जादा अधिकार १४ लाख खटले 



http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=21